Tuesday, 27 November 2018

पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग !
पी डी राऊत गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल !
डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता .
गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुरंग नगर पालिका पवनी शाळेत शिक्षक , श्रीकांत नागपूर जिल्हा कार्यालयात तहसीलदार म्हणून निवृत्त , देवाजी समाज सेवक, हॉस्टेल चे अधीक्षक , बाबाजी राज्य विद्दुत विभागात लाईनमन तांत्रिक दौलत राऊत नेटिविस्ट ! शशिकला , शेवंती , गृहिणी ! आज फक्त दोनच हयात देवाजी , दौलत !
वर्ष , दोन वर्ष च्या अंतराने आम्ही सर्व भावंडे , घर गच्चं भरलेलं . परत आजी काही वर्ष जिवंत .असे हे ११-१२ लोकांचे एकत्रित कुटुंब .वडील डोमाजी लहुजी राऊत , आजी पार्वताबाई मूळ चे माहेर पावनीचेच , गणवीर कुटुंबातील . मामा कडील मोटघरे , मेश्राम, रामटेके गाव जवळच खेड्यात सर्व नातेवाईक , येणे जाणे रोजचेच , पवनी चा मंगळवार , शनिवार बाजार दिवस ,शाळा , पोस्ट , बँक ,पंचायत समिती , माध्यमिक , उच्च शाळा , दवाखाना पावनीलाच म्हणून नातेवाईकांचे रोजचे येणे जाणे हा आमच्या घराचा नित्य पसारा . डोमाजी राऊत तांदळाचे व्यापारी ट्रक भरून माल नागपूरला घेऊन जायचे , शनिवारी , मंगळवारी बाजारात तांदळाचे मोठे दुकान आणि इतर गुजरी चे दिवशी सुद्धा बाजारात दुकान मांडून बसत . एम पी मध्ये तांदूळ ट्रक नेतानात एक दा जप्त झाला आणि तिथून उतरती सुरू झाली , मग गुळाचा व्यवसाय केला .मोठ्या दोन तीन मुलांचे लग्न आणि स्वतंत्र संसार सुरू झाले तेव्हा आमची अर्थी स्थिती बिघडली . पांडुरंग राऊत मोठाभाऊ नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून लागला पण पगार मिळेना , पाचपाच , साहसहा महिने पगार नाही हि स्थिती , त्या वेळी सर्वानी मेहनत घेतली . तेंदूच्या पानपट्टी पुड्या साठी माय जंगलात जायची , पान गठ्ठा घेऊन याऊची , ते सर्व आम्ही चवलायचे , पुडे बांधायचे , संध्यकाळी नेवून द्यायचे . या सर्व कामात मोठा भाऊ पांडुरंग , वाहिनी तरबेज . तेव्हा नेटिविस्ट ८ वीत होतो . नेटिविस्ट बी कॉम फायनल शिकत असताना १९७० साली वारले तेव्हा पासून मोठे भाऊ पांडुरंग यांची सर्व लहान भाऊ , बहीण यांचे संगोपन , शिक्षण , लग्न आदी सर्व कार्य केले .
पी डी राऊत गुरुजी म्हणून आता मोठे भाऊ पांडुरंग राऊत याना पवनी आणि शेजार पाजारच्या खेड्यातील लोक ओडखयाला लागली होती . त्याचे कारण म्हणजे नागपूर च्या मारिश कॉलेज मधून फर्स्ट इयर बीए झाल्या बरोबरच दादा ने पावनीच्या सिद्धार्थ वसतिगृहात , सेक्रेटरी , अधीक्षक म्हणून काम करणे सुरू केले होते . हे वसतिगृह समाजाने बरेच वर्षय आधी सुरू केले होते पण त्याला सरकारी मान्यता , अनुदान नव्हते . तेव्हा त्याला एकाद्या संस्थेशी संलग्न करावे किव्हा , संस्था नोंदणी करावी , रेकॉर्ड वेवस्थित ठेवावे , ऑडिट करून घ्यावे असे जिकरीचे काम होते ते न केल्या मुले , अनुदान , मान्यता मिळत नव्हती आणि म्हणून शशिक्षित तरुण पी डी राऊत गुरुजी ते करतील म्हणून स्वात्यंत्र सेनानी मन्साराम राऊत यांनी पी डी राऊत गुरुजी तुम्ही सेक्रेटरी व्हा , मी अधीक्षक होतो असे सांगून संस्था भारत सेवक समाज या संस्थे बरोबर सिद्धार्थ वास्तूगृह सलग केले , पी डी राऊत नि सर्व रेकॉर्ड नीट बनविला , ठेवला आणि त्या मुले वसतिगृहात मान्यता आणि अनुदान मिळाले . पुढे हे वसतिगृह विदर्भातील सर्वोत्तम वसतिगृह म्हणून ओळखले गेले . शेकडो विद्यार्थी तिथे राहून ,उच्च पदस्थ अधिकरी झाले . पुढे पी डी गुरुजी तुम्ही शिक्षक आहेत मी सेक्रेटरी होतो असा मन्साराम राऊत यांनी आग्रह धरला . पीडी राऊत गुरुजी मानधन न घेता अधीक्षक म्हणून जाम करू लागले .
शाळेतील काही गुरुजी म्हणजे मयूर , खापर्डे यांना घेऊन , पीडी राऊत गुरुजींनी नालंदा शिक्षण संस्था काढली . परत सर्व रेकॉर्ड ठेवले , हिशेब ठेवले , सेक्रेटरी म्हणून सर्व कामे केली , नालंदा हॉस्टेल काढले , सरकारी मान्यता मिळवून घेतली यातून अनेक मुले राहून शिकली , मोठी झाली . युद्धात जिंकलो तहात हरलो म्हणजे पीडी राऊत गुरुजी . मेहनत जीवापाड केली , गटबाजीत हरले . नालंदा शिक्षण संस्थेतून सक्रिय सहभाग पुढे कमी कमी केला . आत्म समाधानी आणि सन्यस्थ वृत्ती ने त्यांनी सर्व सोडून दिले कारण घरी असलेला धर्मात्मा कबीर बाबा फरीद चा वारसा ! आमच्या घरी असलेला नाग मंदार !
पुढे पीडी राऊत गुरुजी दूरस्थ शिक्षणाने बी ए झाले . भंडारा तुन बी एड केले , आई स्वरूप वाहिनी दादाने ठेवलेले पुष्पा आणि माहेरचे शांता, आरमोरी तील खापर्डे कुटुंबातील प्राथमिक शाळेत शिक्षिका झाल्या . मुल्ह्याध्यपिका झाल्या , निवृत्त झाल्या . दादा गेल्या नंतर खंबीर पणे उभ्या राहिल्या . त्यांना दोन आ अपत्ये मोठी मुलगी प्रतिभा , मुलगा सतीश . मुलगी भंडार्याच्या मेश्राम कुटुंबात आज दोन मुलांना घडवीत आहे .सतीश वारल्या मुळे आता वाहिनीच कुटुंबाचा आधार ! सतीश चा एक मुलगा , एक मुलगी आज कुटुंब वत्सल आजी आणि हयात भर सर्वांचे भले केलेली, सर्वात आदरणीय आमच्या वाहिनी यांच्या छत्र छायेत, शिक्षण घेत आहेत .
नेटिविस्ट डी डी राऊत वयाच्या १२-१३ वर्ष्या पासून हे सर्व त्यांचे मोठे बंधू पीडी राऊत गुरुजी चे कार्य पाहत होते , लोकांच्या घरी जा त्यांच्या साह्य घ्या त्यांना मासेज द्या, मिटिंग साठी बोलवून आणा , चहा , पाणी द्या हे सर्व काम नेटिविस्ट डी डी राऊतच करीत असत . तिथूनच नेटिविस्ट डी डी राऊत वर समाज सेवा , शैक्षणिक उपक्रम निर्माण करण्याची , जिद्दीने काम करण्याची प्रेरणा मिळाली . नेटिविस्ट राऊत नि केवळ पीडी राऊत आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने एम कॉम पर्यंत शिक्षण , जि एस कॉमर्स कॉलेज , नागपूर येथे घेतले , इंग्रजी , इतिहास , राज्यशास्त्र असे असंख्या विषयाचे राऊत गुरुजींनी गोळा केलेलले पसतके वाचली , पुढे मुंबई ला ऑडिटर म्हणून कामाला लागला . कल्याणला इंग्रजी मध्यम ची प्राथमिक शाळा काढली , मान्यता मिळवून घेतली , बाल गृह सुरू केले , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट स्थापन केली , नेटिव्ह पीपल्स पार्टी निर्माण केली . ह्या सर्वांच्या पाठी मागे एकच प्रेरणा आणि ती म्हणजे पीडी राऊत गुरुजी , माझे मोठं भाऊ , माझे पांडुरंग !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Sunday, 25 November 2018

सर्वांचे लाडके आप्पासाहेब  उर्फ विजय विसपुते

आप्पासाहेब  म्हणजे विजय विसपुते , एक लोभस , निरागस , कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व . जणू महात्मा  फुले यांच्या सुगंधित विचारील बागेतील उत्तोमोत्तम फुल. आप्पासाहेब  खरे म्हणजे अनेक मूळ भारतीय विचार मंच कार्यकर्त्यात वयाने लहान तरी सर्व त्यांना आबासाहेबच म्हणायचे . त्यांचे आई वडील , एक लहान भाऊ , एक आते भाऊ  आणि सुस्मित. सदावत्सल त्याची धर्म पत्नी असा त्यांचा परिवार कल्याण कोडसेवाडी इथे राहायचा . तसे ते मूळ चे जळगाव चे , वडिलोपार्जित सोनाराच्या व्यवसाय . शिक्षण घेऊन , बायलर तंत्र शिकून ते मुंबई उपजिविके साठी आले , सामाजिक मान्यते ने लवकर लग्न करून ते कल्याण ला आले मिळे तेथे खाजगी कमानीत नौकरी स्वीकारली , भाऊ बी कॉम शिकत होता , आते भाऊ इंजिनीरिंग करून नौकरी शोधण्यासाठी आला होता असा हा सर्व कौटम्बिक संसाराचा पसारा एका दहा बाय बारा  च्या खोलीत शिवाय आमचे सारखे किती तरी सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यान्च्या कडे येणे जाणे , आणि अगत्य पूर्ण , चहापान जणू हा त्यांच्या घरचा नित्यक्रमच झाला होता !

नेटिविस्ट डी डी राऊत तेव्हा कल्याण पूर्वेत बहुजन एडुकेशन फौंडेशन  ऑफ इंडिया या संथचे संस्थापक अध्यक्ष होते , नवीन इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा काढली होती नाव होते पेरियार रामास्वामी इंग्लिश स्कूल . मेश्राम नावाचे बी एस एन एल मधून डावी. इंजिनीर च्या जिम्मी बाग परिसरात ४ खोल्या २० हजार डिपोषित देऊन घेतल्या होत्या तिथे अनेक मानवर शाहू  महाराजांच्या जयंती चे दिनी शाळेचे करपे यांच्या घरी मोठ्या हाल वर केले होते . बहुजन या उक्ती प्रमाणेच संस्थेत, ब्राह्मण सोडून इतर जातीचे २० सदस्य होते , एन एस जगजापे  संस्थेचे  सचिव , ए जि आफिस मध्ये अकाउंट्स ऑफिसर होते तर नेटिविस्ट राऊत , आई  टी आई  मध्ये अकाउंट्स / ऑडिट आफिसर . जोधे , तलमले  तेली समाजाचे होते तर गोन्नाडे कोष्टी समाजाचे होते . कोळी समाजाचे होते तर तामिळनाडूचे   एक इंजिनेर होते , मेश्राम , माटे, एल एन  खापर्डे,
अशी  हि बहुजन मंडळी

शाळेला कायम विनाअनुदान तत्वावर शासकीय मान्यता चौथी पर्यंत , सातवी पर्यंत चा पर्याय खुला पण मुळेच मिळेनात . वर्गात ५ , १० , १५ ,, २० मुले , फी सर्व शाळेपेक्षा कमी , सोयी नुसार द्या एवढी शिथिलता , मारिया , नायर , एलिझाबेथ , सॅन्ड्रा ,  मोरे सारखे चांगले इंग्रजी , मॅथ्स चे शिक्षक , खुद्द नेटिविस्ट ची दोन्ही मुले याच शाळेत जेणे करून विश्वास बसावा आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही . पण विश्वास ठेवेल तो बहुजन समाज कसला ? रास्ता वाढी इमारत पाडली, आम्ही रस्त्यावर आलो , तीन वर्ष्या पूर्वी अनाथपिंडक सुरू केले दहा अनाथ मले, एक माउली ठेवली स्वतःच्या खर्चाने दहा मुलाचा घरी ठेवून सुद्धा सांभाळ केला पण विस्वास ठेवणार तर तो बघून समाज कसला . हो डॉक्टर शेळके निशुल्क तपासायचे तर  डॉक्टर दिलीप मेंढे कुटुंब कधी या पोरांना जेवायला बोलवायचे . सिंधी , मराठा , महार , मातंग अश्या समाजातील हि मुले होती . सरकारी ४० हजाराचे अनुदान मान्य झाले अट  ५०० चौरास फूट बांधकाम असलेली ४ खोलीचे ठिकण दाखवा . कुठन आणायची ? शाळेला जागा नाही , अनाथ मुलांच्या गृहाला जागा नाही , वरून सदश्यची माल्लीनाथी , तुम्हाला कोणी सांगितले होते हे करायला ! तुम्ही पाहत बसा ! आम्ही सही करणार नाही , ऑडिट लांबणीवर , विलंब अस्या किती तरी समश्या ! त्या वेळी संस्थेत साधे सदस्य हि नसलेले विजय विसपुते म्हणजे जिवलग मित्र , आपले दुःख सांगा ते निदान एकूण घेऊन दिलासा देतील याचे कारण म्हणजे नेटिविस्ट चे चाललेले निरगर्वीष्ठ समाज कार्य ते मूळ भारतीय विचार मंच , ब्लू व्हील क्रॉस अश्या संघटनेत आणि नेटिव्ह पीपल्स पार्टी च्या स्थापने पासून  त्यांनी कोषाध्यक्ष म्हणून सांभाळलेली जबाबदारी  व त्यानून निर्माण झालेला विश्वास होता .

आप्पासाहेब  विसपुते नेहमीच नेटिविस्ट डी डी राऊत , गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर भीमराव गोटे यांच्या खांद्याला खांदा लावून , एकटे नव्हे तर सह कुटुंब उभे राहिले ते नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चे कोणतेही काम असो त्यात ते संस्थापक म्हणून राहिले . ब्लू व्हील क्रॉस हि नैसर्गिक आपत्ती जसे पूर , भूकंप  , मानवी अत्याचार , जाळपोळ , जातीय , धार्मिक भांडणे यात होरपडणारा बघून समाज या साठी निर्माण केली होती , डॉक्टर दिलीप मेंढे यांनी सुद्धा निशुल्क रोग निदान शिबिराला बाबा साहेब उद्यान येथ आपली सेवा दिली आहे . आम्ही मुद्दाम  निळी हाप पॅन्ट व पांढरी ती शार असा ब्लू व्हील क्रॉस चा ड्रेस ठेवला होता . समजा कार्यात लाज कसली हा आमचा विस्वास आहे त्या वेळी आम्ही दहा ची एक युनिट केली होती आणि सकाळी दादासाहेब उद्यानात हाप पॅन्ट घालून जात असू . संघटनेत त्याग आणि निसंकोच असले पाहिजे हे अप्पासाहेब  वीसपुतेंचे मत होते .

विजय विसपुते पुढे एका शासकीय कंपनीत बायलर विभागात नौकरी का लागले आणि मागील वर्षी निवृत्त झाले . त्यांचं लहान बंधू के डी एम सि मध्ये कामाला आहेत आते ते सर्व वेळ समज कार्याला देतात . मुलगा डॉक्टर झाला आहे मुलगी ग्रॅज्युएट होऊन पुढे शिक्षण  घेत आहे , विसपुते ताई हसत मुखाने यजमानाच्या समाज सेवेला यथा शक्ती हातभार लावत असतात , त्याच्या कडे येणारे जाणारे , मित्र परिवार अजून वाढलेले आहे हे त्यांच्या प्रेमळ वृत्ती मुळे .

मध्यंतरीच्या काळात समाज माध्यमावर टाकलेल्या एका माहितीवर लाईक करून कॉपी केल्यामुळे कोणीतरी तिवारी नावाच्या माणसाने एफ  इ आर करून त्यांचे वर गुन्हा नोंदविला विषय , माहिती  जुनी आहे , सत्य आहे पण डोक्याला त्रास . गोटे सर , नेटिविस्ट राऊत नि त्यांना काहीच दिवस पूर्वी सांगितले . घाबरू नका , मी टाकतो ती पोस्ट , करू द्या माझेवर काय ती कारवाई . सत्याला भीती कसली ! फुलेंचे वारीस घाबरत नसतात ! असे हे आमचे आप्पासाहेव विजय विसपुते नेटिव्ह पीपल्स  पार्टी चे संस्थापक कोषाध्यक्ष अजूनही ठाम आहेत अढळ आहेत कारण ते आप्पा साहेब आहेत !

नेटिविस्ट डी डी राऊत